Posts

Showing posts from February, 2020
Image
आजचे शिवभक्त !!! छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे आणि संघर्षाचे पोवाडे गात गडकिल्ले आजही उभे आहेत. शिवबानंविषयी माहिती सांगणारे अनेक महान ग्रंथ, पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमधून उपलब्ध आहे. त्यांची राजनीती ते युद्धनीती, धार्मिक ते कौटुंबिक प्रसंग मांडणारे अनेक ताकदीचे नाटकं, सिनेमे अजूनही आपण पाहतो आहे. शिवबांविषयी आणखीन नवीन मी सांगू आणि काय बोलू ? पण मला मात्र त्यांच्या 'आज'च्या भक्तांविषयी नक्कीच बोलावंस वाटतं. महाराजांचे भक्त संपूर्ण महाराष्ट्र्रातच नाही तर जगभर आहेत. प्रत्येकाला महाराजांची जयंती, उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो करावाच. आजच्या दिवशी त्यांचा संदेश पोहोचवणारे पथनाट्य रस्त्यावर करा, होर्डिंग - बॅनर सगळं लावा आणि मिरवनुकीही काढा आमचं काहीही दुमत नाही. शिवाय महाराजांच्या मूर्तीबरोबर काढलेले सेल्फी आज सोशल मीडियावर टाका त्याला देखील आमचा विरोध नाही. फक्त एक प्रश्न आहे तेही आजच्या सगळ्या शिवभक्तांना !छ. शिवाजी महाराजांसाठी काढलेल्या मिरवणुकीत किंवा रॅलीत नारे देताना जर रस्त्यात चुकून कुणाचा कुणाला धक्का लागला तर "जय भवानी, ज
Image
एक खंत उराशी राहील आता ... आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात आणि अचानक निघूनही जातात पण त्यांच्या या अशा अचानक निघून जाण्याने मन खिन्न होतं . त्यांच्या नसण्य ाची जाणिव ही तेव्हा तीव्र होते जेव्हा आपल्याला माहित होतं की आपल्या प्रवासाची सुरुवात या व्यक्तीच्या आशिर्वादाशिवाय , मार्गदर्शनाशिवाय शक्यच नाही, तेव्हा मात्र पुढचा मार्ग कठीण होऊन बसतो .... PHD करायची म्हणजे काही दिग्गज लोकांच्या मार्गदर्शनाची गरज भासतेच.त्या संदर्भात मार्गदर्शन हवे म्हणून आणि माझ्या मनात विषय निवडीवरून जो गोंधळ होतोय त्या संदर्भात चर्चा करावी म्हणून"ग्रंथसखा"ग्रंथालयाचे प्रणेते "श्री श्याम जोशी" सर याना आज भेटायचे ठरले. त्यांनी दिलेल्या वेळात बदलापूर गाठून"ग्रंथसखा"मध्ये आमची चर्चा सुरु झाली . तिथे पेस्ट कंट्रोलचे काम सुरु असल्याने भल्या मोठ्या पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे जिकडे तिकडे नीट उभे करून ठेवले होते . ते बाजूला सारून आम्ही मधोमध चर्चा करायला बसलो . त्यांना मी टायपोग्राफी मध्येMFA केले असे सांगताच, त्यांनी म्हटलं पुढचा प्रवासही त्यातच करावा असे मत व्यक्त केले आणि
Image
पटनासे आया एक खत... सायकलनं भारतभर 'कलाप्रवास' करण्याची 'प्रतिक'ची ही भन्नाट कल्पना ऐकूनच त्याची पहिली मुलाखत मी 'चिन्ह' साठी घेतली होती. ही मुलाखत सोशल मीडियावर बरीच गाजली. हा प्रवास सुरु करतांना अनेक अडचणी आल्यात. प्रतिकच्या कलाप्रवास सुरु करण्याच्या तारखा सतत बदलत होत्या. त्याला पावसानं यावर्षी घातलेला गोंधळ ही बऱ्याच अंशी कारणीभूत होता. ठरवलेल्या रस्त्यांवर इतका बेधुम पाऊस होता की, रस्ते देखील बेपत्ता झाले होते. शिवाय अनेक तांत्रिक अडचणी सोबतीला होत्याच. प्रवास सुरु कर ण्याधीपासून प्रवासात काय करावं ? काय नको ? कसं डॉक्युमेंटेशन करावं किंवा व्हावं यावर अधून मधून प्रतीक आणि माझी चर्चा सुरु असायची. हा काही थोडा थोडका प्रवास नव्हता तब्बल एक वर्ष ४ महिने त्याची भ्रमंती चालणार आहे. या प्रवासात स्वतःच मनोबल कसं वाढवत राहावं यावर बोलणं सुरु असतांनाच एकदा त्यानं सांगितलं की, 'तो या कलाप्रवासात सहभागी सगळ्यांना प्रवास सुरु झाला की तो जिथं कुठं असेल तिथनं पत्र लिहिल'. त्याची ही कल्पना छानच होती पण मला वाटलं कसं शक्य होईल याला ? एवढी सायकल
Image
सायकलवरून भारत भ्रमण ... "पंख असणाऱ्यांना क्षितिजाची तमा नसते... " असं म्हणतात. ते खरंच आहे. 'प्रतीक जाधव' या बीडमधील वडवणीसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या ध्येयवेड्या तरुण कलाकाराची ही कहाणी ऐकल्यानंतर या वाक्याची साक्ष नक्कीच पटेल. 'प्रतीक जाधव' जेजे स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागातील अंतिम वर्ष पूर्ण करून कलाक्षेत्रात आपले पाय रोवण्यासाठी धडपड करणारा एक विद्यार्थी आहे. प्रतीकनं शिल्पकलेत अनेक पारितोषिकं मिळवलीत. राज्य कला प्रदर्शनात नाशिक इथं त्याच्या कलाकृतीला 'राज्य' पुरस्कार मिळाला आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याला देखील कलाक्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचं आहे . पण त्याची सुरवात करण्याआधी त्याला स्वतःचं एक मोठं ध्येय साध्य करायचं आहे, कलावंत म्हणून कलेसाठी एक धाडसी पाऊल घ्यायचं आहे. ते म्हणजे "त्याला भारतभरातील कलांचं दस्तावेजीकरण करायचं आहे. एवढंच नाही तर हे दस्तावेजीकरण करण्यासाठी तो लवकरच भारत भ्रमंतीला निघणार आहे .. तेही सायकल घेऊन ". प्रतीकची ही संकल्पना नक्कीच धाडसी आणि कौतुकास्पद आहे. भारतात जिथं जिथं कला जोपासली जा
Image
फक्त उरल्यात आठवणी ....! "कधी काय होईल याचा नेम नसतो ?" अशी वाक्य जेव्हा प्रत्यक्षात अनुभव देतात तेव्हा खूप त्रास होतो . कावळे सर आज आपल्यात नाही ही बातमी अशीच मनाला चटका लावणारी आहे . गणपती बसतात त्याच्या आधल्या दिवशी नेहमीप्रमाणे सरांचे गुड मॉर्निंग मेसेज आलेत . मी त्यांना गणपतीच्या आगमनाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्यावर्षी मला त्यांच्या मुलाकडं अमेरिकेत असताना कसा गणेशउत्सव साजरा होतो हे सांगायला त्यांनी खूप कौतुकानं फोटो पाठवले होते . यावर्षी मात्र ते नागपूरलाच होते आणि गणपतीमध्ये कामात असतील म्हणून मी ही फोन करून बोलणं टाळलं. आता असं राहून राहून वाटत एकदा बोलायला हवं होतं ! नागपूरच्या कॉलेजमध्ये सरांची मी एकटी विद्यर्थिनी होती कारण दुसरं कुणी नव्हतंच टायपोग्राफी शिकणार आणि शिकविणार. मी एकटी असले तरी ते मला रोज न चुकता शिकवायला यायचे . त्यांची कॉलेजमध्ये येण्याची वेळ कधीच चुकली नाही. ते वेळेचे खूप पक्के होते दिलेल्या वेळेत ते आमच्या ठरलेल्या जागी म्हणजे कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पुस्तक आणि मॅगझिन्स घेऊन बसायचे . मी उशिरा गेली किंवा कधी नाही गेली तरी त्यांच्या ठरलेल्
Image
रंगांधळा चित्रकार ??? तो अवघा दोन वर्षाचा असल्यापासून चित्रं काढतोय. घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रतिकूल, पण सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याचा चित्रकलेचा छंद चांगलाच जोपासला. इतका की, सर्वसाधारणपणे आर्ट स्कूला गेल्यावरच विद्यार्थी मॉडेल समोर ठेऊन काम करतात तर हा ते शाळेत असल्यापासूनच करू लागला. नुकताच कुठं त्यानं बारावीला प्रवेश घेतला पण त्याआधीच तो जगविख्यात फ्लोरेन्स अकादमी (इटली ) च्या व्यक्तिचित्रण स्पर्धेत तिसरं पारितोषिक मिळून मोकळा झालाय. या सर्वात कहर म्हणजे तो रंगांधळा आहे. "रेड ' ग्रीन " सारखे काही विशिष्ट रंग तो आपल्या आईच्या साहाय्याने ओळखतो आणि चित्रात वापरतो. फ्लोरेन्स अकादमीने पारितोषकासाठी त्याच्या ज्या चित्राची निवड केली आहे ते चित्र चक्क "रेड" रंगातलंच आहे. आता यावर आपण काय बोलायचं ? खरं तर आपण बोलायचं नाहीच हा लेख वाचायचा आणि आपल्याला त्याला काही मदत करता येईल का एवढंच पाहायचं!   अवघी विशी देखील पार न केलेल्या 'प्रेम आवळे ' या मुलानं चित्रकलेचं कुठलंही शिक्षण न घेता इटलीच्या फ्लोरेन्स शहरातील प्